शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार

शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार>>मागील पंधरा दिवसांपासून शरद पवारांनी जे राज्यात राजकारण पेटवले आहे ते पाहता ग्रामीण तरुण हा त्यांच्या बाजूने आलेला प्रखरतेने जाणवते आहे. शरद पवार हे तसे ग्रामीण भागातूनच आलेले नेतृत्व आहे, त्यामुळे ही गोष्ट सहाजिकच आहे असे म्हणावी लागेल.

परंतु सध्याची सोशल मिडिया वरची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्या बाजूने अथवा त्यांच्या समर्थनार्थ जे काही पोस्ट फेसबुक,व्हाट्सअप इतर सोशल मीडिया वर येत आहेत त्या बहुतांश ग्रामीण भागातील तरुणांच्या आहेत आणि त्याला काउंटर करणारे काही तथाकथित 40 पैसेवाले किंवा स्वयंस्फूर्तीने पोस्ट करणारे शहर भागातील तरुण आहेत आणि आज ते शरद पवारांवर टीका करत आहेत.

शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार
शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार

विशेष म्हणजे यातील बरेच लोक पूर्वी गाव सोडून शहरातील एमआयडीसी मध्ये नोकरीच्या निमित्ताने काम करणारे आहेत. परंतु गाव सोडून आल्यापासून एक दिवस आठवडा सुट्टीचा सोडला तर ते फारसे कधी गावाकडे जात देखील नाहीत किंबहुना त्यांना जावे लागत नाही. त्यांनी एकदा आपल्या गावातील एखाद्या माणसांला विचारावे शरद पवार काय आहेत आणि काय त्यांची कामे.

शेतकरी पुत्र शरद पवार

  •     गावागावात खऱ्या अर्थाने या पाच वर्षात शरद पवारांसारख्या शेतकरी नेत्याची कमी जाणवली कारण शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा आणि खऱ्या अर्थाने शेतीशी नाळ जोडलेला नेता च नव्हता सत्ताधाऱ्यांमध्ये आणि जे कोणी थोडी थोडकी जानकरी असणारे होते त्यांना सरकारनेच सत्तेपासून दूर ठेवले तर काही मंडळी सत्तेच्या हवेत जिरून गेली.
  •      महाराष्ट्राचा माघील इतिहास पाहता शरद पवारांनी खर्‍या अर्थाने शेतकरी समृद्ध केला होता.इतिहासात डोकावत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आठवते शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते म्हणून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना हे शेतकरी पुत्र म्हणाले होते शेतकर्‍यांना पण त्यांच्या मालाला भाव मिळूद्या. एवढे स्पष्ट आणि परखड शेतकर्‍याच्या बाजूने भूमिका घेणारे मंत्री कदाचित ते एकटेच. आता मात्र सरकार कांदाचा भाव वाढला म्हणून लगेच पाकिस्तान आणि इतर देशातून कांदा आयात करते आहे.
  • शरद पवारांना दुसर्‍या हरित क्रांतिचे जनक उगीच म्हणत नाहीत त्यांचे तेवढे काम आहे.

शहरी भागासाठी शरद पवारांचे योगदान

  •    आता आपल्या मूळ विषयाकडे येतो तो म्हणजे शहरी भागा साठी शरद पवारांचे योगदान तर तरुण मित्रांनो हे जाणून घ्या की तुम्ही शहरातील लोक जे शरद पवारांवर कसल्याही भाषेत टीका करताय ना जरा मागे वळून बघा तुमच्या च कुटुंबातील एखादा व्यक्ति तरी शरद पवारांनी केलेल्या कामाचा लाभार्थी असेल,मग कोणी पवारांनीच उभ्या केलेल्या एमआयडीसी मध्ये एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये काम करत असेल,किंवा आलिशान वाटणार्‍या एखाद्या IT पार्क मध्ये कामाला असेल.
  • पण त्यांनी कधी लाभार्थी हे लोकांच्या समोर टीव्ही च्या किंवा इतर कोणत्या माध्यमातून उभे केले नाहीत. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार.
  • शरद पवारांनी शहरामध्ये केलेली कामे आज ही जागतिक नकाश्यावर ठळक पणे दिसत आहेत, हीच त्यांची कामाची पावती आहे. तुम्हीच बघा ना पुण्या सारख्या शहरातील हिंजवडी आयटी पार्क ची संकल्पना देखील पवार साहेबांच्या विचारतील आहे याचं आयटी पार्क च्या जागे वर साखर कारखाना उभारणी साठी भूमिपूजन समारंभा मध्येच साहेबांनी स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध पत्करून आयटी पार्क ची घोषणा केली होती.
  • त्याकाळात जो विरोध झाला त्याच्या उलट परिस्तिथी आज तिथे आहे. आज हिंजवडी आयटी पार्क मुळे फक्त महाराष्ट्रातील चं नव्हे तर देशातील लोकांना रोजगार मिळालेला आहे.
  • आशियातील मोठी MIDC म्हणून नावारूपास आलेली पिंपरी चिंचवड एमआयडीसी साहेबांची चं देण आहे बर का आणि इथे आज जगभरातील Jaguar, Mercedez-Benz, Volkswagen, Tata, Mahindra अश्या नामांकित कंपन्या  आहेत. जिथे आपल्या महाराष्ट्रातील शहरातील व ग्रामीण भागातील तरुणां ना रोजगार उपलब्ध झालेला आहे.
  • नवी मुंबई हे शहर वसवण्याचे काम हे पवार साहेबांच्या विचारातून च झालेले आहे. स्मार्ट सिटी च्या नुसत्या गप्पा मारणारे हे सरकार सत्तेत येण्या आधीच नवी मुंबई हे शहर स्मार्ट झालेले होते.

शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार यांचे धूर्त राजकारण

  •   देश्याच्या राजकरणात आघाडीवर असणार्‍या नेत्याला धूर्त असावेच लागते,आपले शिवाजी महाराज धूर्त नव्हते का? होतेच ना? मग पवार तर शिवरायांच्या विचारावरच चालणारे होते. आणि त्यांच्या ह्या धुर्त स्वभावा विषयीच गैरसमज पसरवण्यात विरोधक यशस्वी झाले.
  • त्यांच्या प्रती गैरसमज पसरविण्यास खर्‍या अर्थाने सुरवात झाली ती 1995 च्या विधान सभा निवडणुकीच्या आधी. पवारांवर आरोप करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार सत्तेवर आले.
  • त्यावेळी गोपीनाथ मुंडे नी तर शरद पवारांचे थेट दाऊदशीच संबंध आहेत आणि आम्हाला सत्ता ध्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे प्रचार सभांमध्ये जाहीर करून देखील प्रत्यक्ष्यात सत्ता आल्यावर ते काही करू शकले नाहीत.
  • तसे आज पर्यंत अनेकांनी पवारांवर खोटे आरोप केले. शरद पवारांवर आरोप करून चर्चेत यायच हाच मूळ हेतु त्या मागचा. किंबहुना काहींनी तर ट्रक भरून पुरावे असल्याचे देखील दावे केले परंतु सगळेच फोल ठरले.
  • केवळ सत्ता काबिज करण्यासाठी कायम पवारांवर आरोप करण्याचे काम सर्वांनी केले परंतु सगळ्यांना पुरून उरला तो हा सह्याद्रीपुत्र.
  •     अगदी आताची निवडणूक देखील पवारांचे विरोधक हे खोट्या आरोपांच्या आधारावर लढण्याच्या तयारीत होते. ज्याप्रमाणे 2014 ची निवडणूक ही त्यांनी खोट्या आरोपांच्या आधारावरच लढवली,आणि सत्तेत आल्यावर मात्र काही कारवाई नाही केली, 5 वर्ष ह्यांची सत्ता असताना काही केले नाही आणि आता निवडणूक कार्यक्रम लागला की लगेच मोठ मोठे आकडे घालून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले.
  • या आरोपांमध्ये काही तथ्य नाही हे पवारांनी ईडी सारख्या संस्थेला डायरेक्ट अंगावर घेऊन दाखवून देखील दिले. पवारांनी ज्या प्रकारे ईडी चे प्रकरण हाताळले ते पाहता विरोधकांनी ज्या ईडी च्या मुद्या वरुण पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच हा डाव उलटविण्यात पवारांना यश आले असेच म्हणावे लागेल.
  • आज संपूर्ण देशात अनेक माजी मंत्री,आणि दिग्गज ज्या ईडी च्या चौकशीला घाबरून आहेत त्या ईडी च्या देखील हाताला हा बाळासाहेबांचा तेल लावलेला मित्र सापडला नाही.

पवारांचा हा Larger then Life प्रवास तरुणांना नक्कीच उर्जादायी आणि प्रेरणा देणारा असाच आहे. वर्तमानात आलेल्या संकटाशी लढायचे कसे हे पवार साहेबांकडून शिकावे.

अश्या प्रसंगांना आव्हान देत असताना शरद पवार कदाचित असे म्हणत असतील ” तेरे हर एक वार पर मै पलटवार हूं ,युही ना कहलाता मै शरद पवार हूं.”  

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

6 thoughts on “शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार”

  1. Nice I read above comment then I understood sharad Pawar .sharad Pawar is very intelligent and clever man. So I proud of you

  2. प्रशांत काळे

    आम्ही साहेबांच्या विचाराचे वारसदार

  3. खरच पवार लोकांना कळलेच नाहित, कोणी भावनिक मुद्यांवर कित्येक लोकांनी पक्ष उभे केले, कोणी वंश परंपरेने नेते झाले , कोणी जातीचे, कोणी धर्माचे, कोणी भाषेचे राजकारण केले पण पवारांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले, जेव्हा मुख्यमंत्रि तेव्हा संपुर्ण महाराट्राचा विचार आणि कृृृषिमंत्री असताना संपुर्ण देशाचा विचार, नाहितर आपआपल्या राज्याचा विचार करणारे अनेक नेते आपण पहात आलोय आणी पहात आहोत

  4. मी
    साहेबांच्या विचाराचां
    माझा जाणता राजा

  5. प्रसृतच्या लेखकांनी मांडलेले विचार आतीषय स्तुत्य आहेत. मी माझ्यापरीने त्यात थोडी भर घालण्याचा प्रयत्न करतो. बघुया साहेबांची बदनामी कमी होण्याच्या कमी त्याचा काय उपयोग होतो का?
    गोष्ट 1991 ते 95 chya काळातील. नुकत्याच त्या वेळी झालेल्या निवडूका मध्ये केंद्रात पहिल्यांदाच विक्रमी बहुमताने निवडून येवून (तसे ते नेहमीच येतात) सन्माननीय नरसिंहराव gvmt मध्ये साहेब defence मिनिस्टर होते. तेवढ्यात बाबरी मस्जिद पडल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर दंगली उसल्या त्याची सर्वात ज्यास्ता झळ बॉम्ब स्फोटाच्या रूपाने मुंबईला लागली. त्या वेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यां विरोधात गाहजब होवून त्यांना कामाची धावपळ झेपेनाशी झाल्या मूळे त्यांना बदलण्याचा विचार झाला तेव्हां सर्व प्रथम साहेबांच नाव समोर येवून त्यांना महाराष्ट्र त cm म्हणून पाठवलं गेलं. (कदाचित तो त्यावेळच्या घाणेरड्या राजकारणाचा भाग आसेल नसेल ते बाजूला ट्टेवू) साहेबांनी ह्यातील कोठल्याही नकारात्मक बाबीकडे न पाहता हे आव्हान म्हणून स्वीकारून रात्रंदिवस झगडून मुंबई आठाच दिवसात पूर्वपदावर आणून हम हैं ना च्या आविर्भावात जनते मध्छे प्रचंड आत्मविश्वास जागृत केला. Kevadh हे हिमालया येवढं achievement. ह्याचआ कसल्याही प्रकारच खाजगीत देखील appreciation विरोधकां कडून केल्याचं आजुन तरी ऐकिवात नाही. उलट मुंडे/ खैरनार साहेबां च्य गौंगणी बोंब उठवली ज्यांनी bomspot घडवून आणला ते d company साहेबांचे हस्तक आहेत. मग गडिभर पुरावे ििििििििििििििििििििििििििििि
    (परंतु हे इथ आवर्जून नमूद केलं पाहिजे नंतरच्या काळात खैरनार सहिबानी गुजराती आसपास/चित्रलेखा ह्या मासिकातील मुलाखतीत जाहीर माफी मागून साहेबांनी त्यांचावर आड वळणानी देखील कधीही ह्या प्रकरणात दबाव आणण्याचं प्रयत्न केला नसल्या बद्दल आभार मानले व साहेब कसे महाराष्ट्राचे महान नेते आहेत आशाप्रकरचे वक्तव्य केले ह्यातच सर्व काही आले). आज पर्यंत हे कोणीही पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नाही. किती सरकारे आली आणि गेली. पण साहेबांचं आपलं हाती चले आपणी चाल भूमिका. ह्या सगळ्याचा परिणाम साहेबांची प्रतिमा जबरदस्त मली न होण्यात झाला. कारण विषयांनी विषय वाढत जाऊन राज्याचं नुकसान व्हायल नको म्हणून धीर गंभीरतेने साहेबांनी हे सर्व आरोप खोदून न काढता पोटात घातले आसवेत.पण ह्या सर्व कट कारस्थानामुळे साहेब पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोसो दूर फेकले गेले ते आत्ता पर्यंत. हे त्याच वैयक्तिक व महाराष्ट्राचे सर्वात मोठे नुकसान झाले आसो.
    आजुन ऐक विश्लेषण करू व थांबुया
    हे सर्व 95 निवडूनिकी साठी चाललं होत हे ओघानच आल.
    95 निवडणुकीत साहेबांच्या पक्षाचा पराभव झाला त्यांच्याच नेतृत्व खाली . साहेबाना थोडा सेट बॅक झाला पण घाबरतील ते साहेब कसले. हे सर्व रामायण महाभात होवून ही पुढचं सरकार स्थापनेला विरोधी पक्षांना साहेबांनी कुठल्या तरी पोटनियम ची पळवाट काढून सर्वतोपरी साहाह्या केले आणि मुं डे साहेबाना उप मुख्यमंत्री करण्यामध्ये कसलीही आड काठी येऊ दिली नाही. केवढं हे क्रौर्य. हे फक्त असामान्य माणूसच करू शकतो. (ज्यांनी त्यांना सर्वतोपरी संपवण्याचा प्रयत्न केला त्यालात्याच्या हक्क मिळवून देणे.
    साहेबांचं mind वाचन त स खूपच कठीण आहे. ह्याच्यवर पुन्हा केव्हा तरी
    टीकाकारांनी ती करण्या आधी पुन्हा पुन्हा विचार करावा.

Comments are closed.

Scroll to Top