आत्मनिर्भर म्हणजे काय ? “Aatmanirbharta” >>इतरांच्या वर अवलंबून न राहणे म्हणजे आत्मनिर्भरता.आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वतःचे स्वतः बघणे.
आत्मनिर्भरता हा शब्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वापरल्या मुळे सगळी कडे ह्या शब्दाची चर्चा सुरू झाली आहे.
लोक इंटरनेट वर हा सर्च करत आहेत जनतेला प्रश्न पडला आहे आत्मनिर्भर म्हणजे काय ? “Aatmanirbharta means what?”
आज च्या कोरोना विषाणू च्या भयावह परिस्तिथीत देखील आपले पंतप्रधान त्याचा इव्हेंट करण्यात तरबेज आहेत अश्या प्रतिक्रिया सर्वत्र येत आहेत.
आत्मनिर्भर भारत आणि २० लाख करोड अश्या शब्दांची नेटिझन कडून खिल्ली उडवली जात आहे.
मुळात ज्या गोष्टींची गरज आणि अपेक्षा लोकांना मोदींच्या भाषणातून होती ती म्हणजे संपूर्ण देश भरात होत असलेले असंख्य कामगारांचे स्थलांतर.
असे म्हणतात की आता जे स्थलांतर होत आहे ते फाळणी नंतरचे सर्वात मोठे स्थलांतर आहे.
पण तरी देखील मोदींच्या भाषणात त्याचा उल्लेख नसणे,या उलट मोदी म्हणत आहेत “आत्मनिर्भर बना” म्हणजेच “तुमचे तुम्ही बघा” हे नेटिझन्स ला काही रुचलेले नाही.
मोदींनी केले देश वासीयांना संभोधित
विश्व की आज की स्थिति हमें सिखाती है कि आगे का मार्ग है- “आत्मनिर्भर भारत”! #AatmanirbharBharat pic.twitter.com/rLYl3PpNBV
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2020
- देशात आज अगणित लोकांचे रोजगार धोक्यात आलेले आहेत,असंख्य लोकांचे २ वेळेचे जेवण मिळवणे मुश्किल झाले आहे,आणि कोरोना विषाणू चा कहर वेगळाचं.आणि अश्या परिस्थितीत देशाचे पंतप्रधान म्हणतात आत्मनिर्भर बना.
- हजारो किलोमीटर चालणाऱ्या त्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना आज खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना आपला पंतप्रधान मात्र म्हणत आहे आत्मनिर्भर बना (तुमचे तुम्ही बघा)! वा मोदीजी वा!अशी भावना नेटिझन व्यक्त करत आहेत.
- नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या,प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा ही मोदींची सवयच आहे.त्यातीलच एक म्हणजे २०लाख कोरोड ची घोषणा.एवढी मोठी रक्कम कशी वापरणार या बद्दल साधा उल्लेख देखील नाही का १५लाख सारखा हा सुद्धा एक जुमालाच समजायचा. अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे.
आत्मनिर्भर म्हणजे काय ?
- खाली काही आजच्या ह्या पारिस्तिथी मुळे हतबल झालेल्या लोकांचे फोटॊ आहेत त्यांनी कुठून आणायची आत्मनिर्भरता,त्यांना आता खर्या अर्थाने सरकार कडून मदतीची अपेक्षा असताना मोदींचे भाषण ऐकून ते म्हणत असतील आत्मनिर्भर म्हणजे काय ? म्हणजे आता अश्या वेळी आमचे आम्ही बघू का ? “वा मोदीची वा “.






आत्मनिर्भरता ही महत्वाची आहेच पण त्या आधी माणुसकी महत्वाची आहे आता ह्या परिस्तिथीत माणसाला माणुसकीची गरज ही आत्मनिर्भरते पेक्षा नक्कीच जास्त आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.
आमचे इतर लेख:-
भारतातील सर्वात जास्त शिकलेला नेता.
बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा
मा.मु. चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय?
1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)